आंबा घाटातील दरड केली बाजूला
देवरूख : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट येथे गुरुवारी सकाळी दरड कोसळली; मात्र तत्काळ ठेकेदार यांनी जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला करून दहा मिनिटांत मार्ग मोकळा केला. यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.
या मार्गावर नागपूर हायवेचे काम सुरू आहे. यात आंबा घाट रस्ता रुंदीकरणासाठी खोदाई सुरू आहे. पावसात प्रतिवर्षी आंबा घाटात दरड खाली येण्याची घटना घडत असते. याची खबरदारी घेत ठेकेदार यांनी जेसीबी यंत्रणा मार्गावर कार्यान्वित ठेवली आहे.
पावसाचा जोर गुरुवारी जास्त असल्याने महामार्गावरील दख्खन परिसरात सकाळी १०.३० च्या सुमारास दरड खाली आली. ही बाब ठेकेदार यांच्या लक्षात येताच तत्काळ जेसीबीच्या साहाय्याने दरड बाजूला केली. केवळ दहा मिनिटे वाहतूक खोळंबली. यानंतर एकेरी, नंतर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. ठेकेदाराच्या सतर्कतेबद्दल वाहनचालक व पोलिस यंत्रणेने समाधान व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 20/Jul/2024
What's Your Reaction?