रत्नागिरी : बँक ऑफ इंडियातर्फे शुक्रवारी समझौता दिवस

Jul 23, 2024 - 15:26
Jul 23, 2024 - 15:47
 0
रत्नागिरी : बँक ऑफ इंडियातर्फे शुक्रवारी समझौता दिवस

रत्नागिरी : जून महिन्यात आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात आयोजित केलेल्या समझौता दिवस उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ग्राहकांच्या आग्रहानंतर बँक ऑफ इंडियाने रत्नागिरीने सर्व शाखा आणि विभागीय कार्यालयात एक रकमी तडजोड योजनेची ग्राहकांना पुन्हा संधी उपलब्ध करून दिली आहे. निष्क्रिय (एनपीए) कर्ज खातेदारांसाठी एकरकमी तडजोड योजनेंतर्गत त्यांची निष्क्रिय एनपीए कर्ज खात्ती भागविण्याकरिता शुक्रवारी (ता. २६) समझौता दिवसाचे आयोजन केले आहे.

समझौता दिवस विशेषतः अशा निष्क्रिय कर्जदारांसाठी आहे, जे कर्जदार व्यवसायातील, वैद्यकीय परिस्थितीमुळे व इतर परिस्थितीजन्य कारणांमुळे आपल्या कर्जाची परतफेड वेळेत करू शकले नाहीत, त्यांची खाती निष्क्रिय झालेली आहेत. त्या कर्जदारांनी बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखांत तसेच रत्नागिरी विभागीय कार्यालयात होणाऱ्या या विशेष एकरकमी तडजोड योजनेत (ओटीएस) कर्जदारांनी जवळच्या शाखेत जाऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालयाच्या वसुली विभागकडून करण्यात आले आहे. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:54 PM 23/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow