रत्नागिरीतील तारांगणातून २ वर्षांत २९ लाखांचे उत्पन्न
रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या तारांगण आणि स्वा. सावरकर नाट्यगृहाकडून रत्नागिरी नगर परिषदेला चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. तारांगणने तर दोन वर्षांत २९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. अद्ययावत झालेल्या नाट्यगृहाच्या भाड्यातूनही चांगले उत्पन्न मिळत आहे. या दोन्ही वास्तू पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने साकारलेल्या आहेत. राज्यातील २५९ शाळांमधील विद्यार्थ्यांनी या तारांगणातील प्रयोगाचा आस्वाद घेतला आहे.
माळनाका येथील श्रीमान स्व. बाळासाहेब ठाकरे तारांगणातील शो डिसेंबर २०२२ च्या अंतिम आठवड्यापासून सुरू झाले. संपूर्ण राज्यातील २५९ शाळांतील विद्याथ्यांनी तारांगणात जावून शो पाहिले. सुट्टीच्या कालावधीत जितक्या सहली आल्या त्यातील विद्यार्थ्यांनी तारांगणात शो पाहिला. त्यावेळी दररोज ४ ते ५ शो केले जात होते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तारांगण शो चा प्रतिसाद मर्यादीत झाला आहे. त्यामुळे रोजचे दोन किंवा तीन शो होत आहेत. कोट्यवधी रुपयांचे तारांगण व्हावे, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी नेटाने प्रयत्न करून शासनाकडून निधी मिळवला. स्वा. सावरकर नाट्यगृह अत्याधुनिक करण्यासाठीही पालकमंत्र्यांनी निधी मिळवून दिला. पावसाळा असल्याने नाट्यप्रयोग कमी प्रमाणात होत असले तरी आता या नाट्यगृहात इतर कार्यक्रम होत असून त्याचे वाढीव दराने भाडे मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही वास्तू रत्नागिरी नगर परिषदेला उत्पन्न मिळवून देण्याचे स्रोत ठरले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:20 PM 30/Jul/2024
What's Your Reaction?