पुढील दोन दिवस रत्नागिरीला पावसाचा 'यलो अलर्ट'
रत्नागिरी : गेल्या आठवड्यात पावसाचा जोर ओसरलेला होता. पहिल्याच श्रावणी सोमवारही जिल्ह्यात हलक्या श्रावणसरींचा रावता सुरू होता. पावसाचा जोर दक्षिण रत्नागिरीत जोरदार होता, तर उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पावसाचा जोर अजूनही चार ते पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील दोन दिवस 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. कोकणातील काही भागांत मंगळवारपासून जोरदार,
तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार म्हणजे २०० मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आलेला आहे.
रत्नागिरीत सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात पहिल्या श्रावणी सोमवारी हलक्या ते मध्यम सरींचा राबता होता. काही भागात पावसाने उसंत घेतली होती. दुपारी काही भात उघडीपही दिली. त्यामुळे तापमाात किंचित वाढ झाली. दक्षिण रत्नागिरीत पावसाचा जोर होता तर उत्तर रत्नागिरीत पाऊस ओसरलेला होता. सोमवारी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात २४.२१ मि.मी.च्या सरासरीने २१७.९० मि.मी एकूण पाऊस झाला. यामध्ये मंडणगड तालुक्यात जोरदार पावसाची सर्वाधिक ६० मिमी. पावसाची नोंद झाली. दापोलीत ११.४० मि.मी., खेड २१.४०, गुहागर ८.६०, चिपळूण ३०.४०, संगमेश्वर ३३.६०, रत्नागिरी १०.४०, लांजा २२.७० आणि राजापूर तालुक्यात १८.६० मि मी. पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात आतापर्यंत म्हणजे १ जूनपासून २७०२ सरासरीने २४३२६ मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने ८० टक्के मजल मारली आहे. गतवर्षी या कालावधित पाऊस १३ ते १४ टक्के पिछाडीवर होता. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद खेड तालुक्यात झाली आहे तर सर्वात कमी पाऊस गुहागर तालुक्यात झाला आहे.
जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केलेले जिल्हे
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक पुणे, कोल्हापूर.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 06-08-2024
What's Your Reaction?