भाट्ये येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

Aug 8, 2024 - 10:11
 0
भाट्ये येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी : शहरानजीकच्या भाट्ये येथील एका विद्यालयामागे तरुणाने अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, दि. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वा. सुमारास उघडकीस आली.

हृषीकेश विलास पवार (२५, रा. कोळंबे बागवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ ऋत्विक विलास पवार (२३, रा. कोळंबे बागवाडी, रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी ५ वा. सुमारास हृषीकेश आणि ऋत्विक हे दोघे दुचाकीवरून नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यानंतर हृषीकेशने भाऊ ऋत्विकला पुलाजवळ सोडून तो दुचाकीवरून रत्नागिरीच्या दिशेने गेला होता. त्यानंतर काही वेळाने ऋत्विक हा हृषीकेशला फोन करत होता; परंतु फोन उचलत नव्हता म्हणून ऋत्विक त्याचा मित्र प्रणय पवारला घेऊन हृषीकेशचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. सायंकाळी ७ वा. सुमारास ते दोघेही भाट्ये येथील एका विद्यालयाच्या मागील बाजसू गेले असता, त्यांना एका झाडाच्या फांदीला हृषीकेश याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. दोघांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हृषीकेशला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस हवालदार बेंदरकर करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 08-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow