'आरजू' पाठोपाठ आणखी एका कंपनीने रत्नागिरीकरांना घातला कोट्यवधींचा गंडा

Aug 8, 2024 - 10:35
 0
'आरजू' पाठोपाठ आणखी एका कंपनीने रत्नागिरीकरांना घातला कोट्यवधींचा गंडा

राजापूर : सध्या जिह्यात आरजू टेक्सोल कंपनीने रत्नागिरीकरांना कोट्यवधींचा गंडा घातलेला असतानाच आता आणखी एका कंपनीने अनेकांना लाखो रुपयांना चुना लावल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. राजापुरातही या कंपनीकडून अनेकांची लाखो रूपयांची फसवणूक झाल्याची बाब पुढे असून यापैकी चार जणांनी आपली या कंपनीने फसवणूक झाल्याची तक्रार राजापूर पोलिसांत केली आहे. 

या चार जणांची मिळून एकूण साडेआठ लाख रूपयांची फसवणून झाल्याचे त्यांनी केलेल्या तक्रारीवरून पुढे आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती राजापूर पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली आहे.

संशयित कंपनीने राजापूर शहरानजीक परिसरात आपले कार्यालय सुरू करून पैसे जमा करण्यासाठी काही प्रतिनिधींची नियुक्ती करून मोठ्या प्रमाणावर पैसे जमा करून अनेकांची फसवणूक केल्याची चर्चा सध्या सुरू असून या प्रकरणी ज्यांची फसवणून झाली आहे त्यांनी पुढे येऊन या विरोधात तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 08-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow