रत्नागिरी : चवे येथील सेवानिवृत्त ग्रामसेवकाचे १५ ऑगस्ट रोजी उपोषण
रत्नागिरी : सेवा निवृत्त झाल्यानंतर माझ्या सेवेकाळात माझ्यावर आकस बुद्धिने हेतूतः कारवाई करून सन १९८१ मध्ये फक्त ३२५ रुपयांचा अपहारनिमित्त फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर निलंबनाच्या कालावधीत फरक व कालबद्ध पदोन्नतीचा लाभ अजून दिलेला नाही. याबाबत आपण १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसणार आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती रत्नागिरी तालुक्यातील चवे येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक विलास काळे यांनी दिली.
या बाबत विलास काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर कसा अन्याय झाला ते सांगितले. सन १९८१ मध्ये ३२५ रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका माझ्यावर ठेवण्यात आला. मूळात हा अपहार झालेला नव्हता. फक्त ही रक्कम दुसऱ्या एका योजनेच्या खात्यात भरण्यात आली होती. असे असुनसुद्धा आपण ती ३२५ रुपयांची रक्कम त्यावेळीच जमा केली होती. यावेळी सहा महिने आपल्याला निलंबित करण्यात आले होते, असे काळे यांनी सांगितले.
याबाबत आपण न्यायालयात दावा दाखल केला होता. यावेळी आपल्याला न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. असे असतानासुद्धा जिल्हा परिषदेने आपल्यावर हेतुपुरस्सर ठपका ठेवत कारवाई केली. निलंबीत कालावधीतील फरक व कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळावा, यासाठी आपण अनेक वर्षे झगडत आहोत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल, असे काळे यांचे म्हणणे आहे. या प्रशासनाच्या विरोधात आपण १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार आहोत. याबाबत रितसर निवेदन दिले आहे, असेही काळे यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 10/Aug/2024
What's Your Reaction?