संगमेश्वर : काटवली ढोसळवाडीचा पाणी प्रश्न सुटला
संगमेश्वर : काटवली ढोसळवाडी येथील ग्रामस्थांनी अत्यंत गरजेचा असलेला पाण्याचा प्रश्न आमदार शेखर निकम यांनी तातडीने सोडवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यामुळे आमदार निकम यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी तुमच्या पाठी खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन दिले.
या वेळी आमदार निकम यांनी राष्ट्रवादीची बांधणी करण्यासाठी जे-जे करावे लागेल ते प्रामाणिकपणे करत राहणार आहे. त्यासाठी तुमची साथ लागेल, अशी साद कार्यकर्त्यांना घातली.
अनेक लोक दारावर येऊन थांबले आहेत, तसेच इतर राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षात येण्याच्या मार्गांवर आहेत. त्यामुळे लवकरच मोठा राजकीय भूकंप चिपळूण मतदारसंघात होणार असल्याचे संकेत आमदार निकम यांनी दिले. यावेळी काटवली ढोसळवाडीतील जयराम घवाळी, आत्माराम कळंबटे, गोविंद मांडवकर, अर्जुन कळंबटे, चंद्रकांत उबारे, सुनील उबारे, एकनाथ उबारे, संतोष उबारे, संदीप कळंबटे, आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:08 PM 13/Aug/2024
What's Your Reaction?