रत्नागिरी : जिल्ह्यात 'वयोश्री'चा ३ हजार ९० ज्येष्ठांना लाभ

Aug 14, 2024 - 10:00
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात 'वयोश्री'चा ३ हजार ९० ज्येष्ठांना लाभ

रत्नागिरी : मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ जिल्ह्यातील ३ हजार ९० ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. या ज्येष्ठांच्या खात्यावर ९२ लाख ७० हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेत ३ हजार रुपयांप्रमाणे साधने घेण्यासाठी लाभ देण्यात येत आहे.

वयाची ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना म्हणून त्यांना आवश्यक सहाय्य उपकरणे, साधने खरेदी करण्यासाठी त्याबरोबर मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र आदींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे. या योजनेत ३ हजार रुपयांप्रमाणे साधने घेण्यासाठी लाभ देण्यात येणार आहे.

ज्या व्यक्तीचे वय ६५ वर्षे आणि त्याहून अधिक आहे, अशी व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल. लाभासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे, तसेच जिल्हा प्राधिकरणाचे प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड पुरावा ग्राह्य धरला जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 14/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow