सामंत फडणवीस यांच्यात रत्नागिरीच्या या विषयावर झाली चर्चा...
रत्नागिरी : काल रत्नागिरीत झालेल्या माझी लाडकी बहिण कार्यक्रमावर भाजपने टाकलेला बहिष्कार यामुळे रत्नागिरीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विधानसभेच्या तोंडावर महायुती पडलेली ही वादाची ठिणगी आता शमणार की अधिक वाढणार याबाबत ठिकठिकाणी चर्चा सुरू आहे.
रामदास कदम यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा अन्यथा आमची असहकाराची भूमिका कायम राहील, असे असे वक्तव्य भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी काल केले होते. आमचा स्थानिक नेतृत्वाशी कोणताही वाद नाही, असा खुलासा देखील राजेश सावंत यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर महायुतीतील हे अंतर्गत वाद क्षमवण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांनी पुढाकार घेतल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज एका कार्यक्रमाप्रसंगी रत्नागिरी घडलेल्या प्रकारासंदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांच्यामध्ये पूर्वीपासूनच घनिष्ठ संबंध आहेत. याचा प्रत्येक देवेंद्र फडणवीस यांच्या मागील दौऱ्यात देखील अनेकांना आला होता. आता रत्नागिरी जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची भूमिका बदलणार काय? आणि कदम चव्हाण वादावर पडदा पडणार काय? या प्रश्नांवर काहीच दिवसात तरी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:44 22-08-2024
What's Your Reaction?