राजापूर : भू गावात शेतकरी, मच्छीमारांचे आंदोलन

Aug 23, 2024 - 10:15
Aug 23, 2024 - 11:18
 0
राजापूर : भू गावात शेतकरी, मच्छीमारांचे आंदोलन

राजापूर : समृद्ध कोकण संघटनेच्यावतीने गुरुवारपासून तालुक्यातील भू गावात बेमुदत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. जोपर्यंत कोकणातील शेतकरी व मच्छीमारांचे प्रश्न सुटत नाहीत तसेच शेतकरी व मच्छीमारांना योग्य तो हमीभाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा समृद्ध कोकण स्वराज्य भूमी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. कोकणातील शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, पर्यटन विकास या न्याय हक्कासाठी व मागण्यांसाठी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समृद्ध कोकण संघटना अध्यक्ष संजय यादवराव यांच्या नेतृत्वाखाली हे स्वराज्यभूमी आंदोलन हाती घेण्यात आले आहे. 

जर शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल असा इशारा संजय यादवराव यांनी दिला आहे. गुरुवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून हे साखळी उपोषण आंदोलन सुरू झाले आहे. 

२२ ते २४ असे तीन दिवसांमध्ये भू, खिणगिणी या गावांमध्ये आंदोलन सुरू राहणार असून, येणाऱ्या २६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरीवर मोर्चा काढण्यात येणार असून, या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण छेडण्यात येणार आहे. बोपर्यंत मच्छीमार व शेतकरी संघटनेच्या मागण्या पूर्ण होत नाही चोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असून, जर का या आंदोलनाचा सरकारने योग्य तो विचार केला नाही, तर मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर शेतकरी व मच्छीमार संघटनेच्यावतीने बहिष्कार टाकण्यात येईल असादेखील इशारा समृध्द कोकण संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात भू दशक्रोशीतील शेतकरी, बागायतदार, मच्छीमार सहभागी झाले आहेत.

राज्यात ऊस, कापूस, सोयाबीन यासह अन्य पिके धोक्यात आली की शासन तत्काळ त्याची दखल घेते व त्यांना परीपूर्ण मदत देते. तथापि, कोकणातील आंबा, काजू पिकांसह मासेमारीवर संकट आले की, शासन लक्ष देत नाही असा आरोप आंदोलनकत्यांमधून करण्यात आला. कोकणातील समस्यांबाबत शासनाचे लक्ष वेधले असून, तत्काळ मदत देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांमधून करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 23/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow