कसोप नजीक रिक्षेवरील ताबा सूटल्याने अपघात; चालकाचा मृत्यू

Sep 12, 2024 - 11:34
 0
कसोप नजीक रिक्षेवरील ताबा सूटल्याने अपघात; चालकाचा मृत्यू

रत्नागिरी : बेदरकारपणे रिक्षा चालवून अपघात करत स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना बुधवार 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वा.कसोप फाटा ते कसोप जाणार्‍या रस्त्यावरील उताराच्या वळणात घडली होती.

सुहास विष्णू साळवी (48, रा.कसोप, रत्नागिरी) मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी ते आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच -08-एक्यु- 4327) घेउन कसोप फाटा ते कसोप जाणार्‍या रस्त्याने बेदरकारपणे घेउन जात होते. तेथील उतारातील वळणात त्यांचा रिक्षेवरील ताबा सूटल्याने रिक्षा उजव्या बाजुला मातीच्या कठड्याला धडकून हा अपघात झाला. यात सुहास साळवी यांच्या डोक्याला, हाता-पायांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 12-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow