अखिल भारतीय मराठा महासंघ रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी संदीप सावंत यांची निवड
चिपळूण : मराठा समाजासह बहुजन समाजाचे मजबूत संघटन असलेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदावर चिपळूणमधील आक्रमक नेतृत्व असलेले संदीप सावंत यांची निवड करण्यात आली आहे. महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी पत्र देऊन संदीप सावंत यांच्या नावाची घोषणा केली आहे.
संदीप सावंत गेले कित्येक वर्ष समाजकारण व राजकारणात कार्यरत आहेत. सर्वसामान्यांसाठी २४ तास उपलब्ध असणारे नेतृत्व म्हणून त्यांची चिपळूण व संपूर्ण जिल्ह्यात ओळख आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेत अखिल भारतीय मराठा महासंघाने त्यांना थेट रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
संदीप सावंत यांची निवड जाहीर होतात संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्वांना बरोबर घेऊन तरुणांना विश्वासात घेतानाच महिलांचे एक मोठे संघटन जिल्ह्यात उभे करण्यासाठी आपले प्रयत्न असतील. यावेळी महामुंबई सरचिटणीस महेश सावंत, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख विवेक कदम, चिपळूण तालुका संपर्कप्रमुख किशोर घाग, डॉ. सौ. सुवर्णा पवार, सरचिटणीस नम्रता भोसले, खजिनदार स्मिता वारंग उपस्थित होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 28/Aug/2024
What's Your Reaction?