रत्नागिरी : बळीराजा वीज योजनेचा जिल्ह्यातील नऊ हजार शेतकऱ्यांना होणार लाभ
रत्नागिरी : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू केली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. ७.५ एचपी पर्यंतचे कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना असून, एप्रिल २०२४ पासून ही योजना लागू करण्यात आली आहे.
हवामानातील बदलाचा परिणाम पिकावर होत असल्याने शेतकरी संकटात आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा करण्याची घोषणा केली आहे.
त्याची अंमलबजावणी एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. पाच वर्षासाठी या योजनेचा कालावधी आहे. त्यानुसार २०२९ पर्यंत जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
शासनाने एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ अशा एकूण पाच वर्षांसाठी मोफत विजेची घोषणा केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:14 PM 29/Aug/2024
What's Your Reaction?