'धनशक्ती' समोर 'जनशक्ती' हरली : विनायक राऊत
◼️ ''कोकण का रिकामे झाले, अभ्यास करू''
◼️ ''कुठेच अपेक्षित मताधिक्य नाही''
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा निकाल म्हणजे धनशक्ती समोर जनशक्ती हरली. कोकण का रिकामे झाले, याचा अभ्यास आम्हाला नक्कीच करायला लागणार आहे, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली. विनायक राऊत यांना हा पराभव जिव्हारी लागला. अतिशय निराश होऊन त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, विरोधकांनी निवडणुकीत धनशक्तीचा हैदोस घातला. आम्हाला हा निकाल अनपेक्षित आहे. केंद्री मंत्री असताना देखील धनशक्तीचा वापर करून राणेंना निवडुण यावे लागते हे दुर्दैवी आहे. हा विजय फारकाळ टिकणार नाही. संपूर्ण कोकणात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकही उमेदवार निवडून आलेला नाही. कोकण का रिकामे झाले याचा अभ्यास आम्हाला नक्कीच करायला लागणार आहे. शिवसेनेला संपवायची होती, लोकसभेला एक पाऊल मागे आलो. परंतु आम्ही विधानसभेला जागा दाखवून देऊ. कुडाळमध्ये जे मतदान झाले, त्यावर विश्वास ठेवण्यासारखे नाही. रत्नागिरीत जिल्ह्यात देखील दुप्पट मताधिक्याची अपेक्षा होती तेही मिळाले नाही, अशी खंत पराभूत उमेदवार विनायक राऊत यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 05-06-2024
What's Your Reaction?