पूर्णगडमधील मच्छीमारांची मासेमारीसाठी लगबग
पावस : मच्छीमारी बंदीचा कालावधी संपल्याने तसेच पावसाळा अंतिम टप्प्यात आल्याने मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे. त्या दृष्टीने पूर्णगड परिसरामध्ये अनेक नवीन बोटी तयार करून मच्छीमारीसाठी पाण्यात उतरवल्या जात आहेत. पावस, गोळप आदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी बोटी असल्यामुळे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. पावसाळ्यामध्ये नौकांची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात.
यामध्ये दुरुस्ती तर काही मच्छीमार नवीन बोटी व्यवसाय करता तयार करतात. नारळी पौर्णिमेनंतर व्यवसायाला सुरुवात झाल्यानंतर नवीन बोटी खाडीमध्ये मार्गस्थ या व्यवसायात मुस्लिम व खारवी समाज मोठ्या प्रमाणात सहभागी होतो. दरवर्षी चांगल्या प्रकारे व्यवसाय होत असल्याने अनेक व्यावसायिक नव्याने बोटी तयार करतात आणि व्यवसायाला सुरुवात करतात. त्या दृष्टीने पूर्णगड परिसरात नव्याने मच्छीमारी बोटी तयार करून मच्छीमारी करण्याकरिता खाडीच्या पाण्यामध्ये उतरवतात. त्यानंतर त्या बोटीच्या माध्यमातून खोल समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करीत असतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 06/Sep/2024
What's Your Reaction?