रत्नागिरी : मांडवी, भाट्ये किनाऱ्यावर विसर्जनासाठी भक्तांची गर्दी
रत्नागिरी : शहरात सवाद्य मिरवणुका काढत बाप्पांना निरोप देण्यात आला. पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्यामुळे गणेशभक्तांचा उत्साह पाहण्यासारखा होता. मांडवी समुद्रकिनारी हजारो भाविकांची गर्दी झाली होती. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फक्त बाप्पाची मूर्ती घेऊन जाणाऱ्या वाहनांना मांडवीत प्रवेश दिला जात होता. सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. भूते नाका येथे भाजपतर्फे गणरायांवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती.
दुपारी ४ वाजल्यानंतर बाप्पाची उत्तर पूजा करून विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला. ढोल-ताशे, बेजो, लेझीम पथक, भक्तांनी फेर धरून मिरवणूक काढली. रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५८२५ घरगुती व ४ सार्वजनिक बाप्पांना निरोप दिला. त्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ६५३३ घरगुती, जयगड पोलिस ठाण्यातील १७३५ घरगुती व १ सार्वजनिक गणपतींना निरोप दिला. पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४४०५ घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. तालुक्यात कोठेही अनुचित प्रकार पडल्याचे वृत्त नाही. रत्नागिरी शहरात रात्री उशिरापर्यंत मिरवणूका सुरू होत्या. कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिस सर्वत्र तैनात केले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 9/13/2024
What's Your Reaction?