रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालयात राष्ट्रीय मत्स्य संवर्धक दिन साजरा
रत्नागिरी : शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील मत्स्य महाविद्यालयात राष्ट्रीय मत्स्य संवर्धक दिन बुधवारी साजरा करण्यात आला.
यावेळी मत्स्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सध्या कोळंबी संवर्धन क्षेत्रात रत्नागिरी परिसरात कार्यरत असलेले कोळंबी संवर्धक भूपेंद्र परब, आकाश बांडागळे, अनिकेत निवदेकर, नीलेश सावंत, आकाश नाचरे, संकेत हळदणकर यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
कार्यक्रम मत्स्य महाविद्यालयाच्या मत्स्य संवर्धन व मत्स्य जलशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद सावंत यांनी केले. मत्स्य संवर्धन विभागप्रमुख डॉ. अनिल पावसे यांनी विद्यार्थ्यांना कोळंबी संवर्धनाबाबत शास्त्रीय माहिती दिली. मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधाकर इंदुलकर यांनी मत्स्य संवर्धक दिनाचे महत्त्व विषद केले आणि विद्यार्थ्यांनी कोळंबी संवर्धन क्षेत्रात उतरून उद्योजक म्हणून आपली ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गजानन घोडे यांनी केले.
दरम्यान, मत्स्य संवर्धक दिनाच्या निमित्ताने मत्स्य महाविद्यालयाने चार दिवसांपूर्वी कोळंबी बीज संचयन केलेल्या महाविद्यालयाच्या आवारातील संवर्धन तलावावर कार्यक्रम आयोजित केला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:14 11-07-2024
What's Your Reaction?