चिपळुणात पावसामुळे १५ लाखांचे नुकसान
चिपळूण : गेले दोन दिवस चिपळूण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. अतिवृष्टी झाली म्हणून शाळांना सुट्टी जाहीर झाली. मात्र सुट्टी झाल्यानंतर पावसानेही सुट्टी घेतली. आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून गेल्या चार दिवसात झालेल्या पावसाने चिपळूण तालुक्यात १५ लाखांचे नुकसान झाले आहे.
उमरोली येथे सुरेखा चव्हाण यांच्या शेतकरी मळा या हॉटेलमध्ये अतिवृष्टीमुळे पाणी शिरल्याने त्यांचे १० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. नारदखेरकी येथील सुनिता हुमरे यांच्या कौलारू घराचे ८० हजार रूपयांचे नुकसान झाले असून, घराला धोका निर्माण झाला आहे. परिणामी त्यांचे शेजाराच्या घरात स्थलांतर करण्यात आले आहे.
वाधिवरे-भोईवाडी अंगणवाडी संरक्षण भिंत कोसळून २० हजार, बामणोली आरोग्य केंद्राची संरक्षण भिंत कोसळून ३० हजार रूपये, बौडवाडी येथील सार्वजनिक शौचालय कोसळून ३५ हजार, कात्रोळी येथील रंजित जाधव यांच्या गोठ्याचे ६ हजार ५०० रूपये, शिरगाव येथील शेवंती गोटल यांच्या घराची भिंत कोसळून २० हजार, प्रकाश नागे यांच्या घराची भिंत कोसळून ४० हजार, मार्गताम्हाणे येथे पऱ्याचे पाणी घरात जाऊन रामचंद्र गावणंग यांचे ९५ हजार, गुलाब पवार यांचे ७० हजार, साहेबराव चव्हाण यांचे ६५ हजार रूपये, निवर्हाळ येथील अमित वाघे यांच्या घराची सरंक्षण भिंत कोसळून ६ हजार रूपयाचे नुकसान झाले आहे.
तसेच पेढे कुंभारवाडी येथील शरद पडवेकर यांच्या घराशेजारील शाळेवर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले. तेथे काम करणाऱ्या सुप्रिया पडवेकर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. मालदोली, वडेरू आदी गावांमध्ये लहान-मोठ्या दरडी कोसळल्या
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 12/Jul/2024
What's Your Reaction?