पावस बसस्थानक परिसरातील 'त्या' विहिरीची सफाई करण्याची मागणी
पावस : पावस बसस्थानक परिसरातील खासगी पाण्याच्या विहिरीची साफसफाई न केल्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या विहिरीची तातडीने साफसफाई करावी, अशी केली आहे.
पावस बसस्थानकाजवळ रस्त्यालगत असलेल्या खासगी विहिरीचा वापर या परिसरातील हॉटेल व्यावसायिक करतात. परंतु गेले कित्येक दिवस अथवा महिने या विहिरीची साफसफाई न केल्यामुळे विहिरीच्या सभोवताली कचरा साचलेला आहे. परंतु तेथील साफसफाईकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे या परिसरात साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. रस्त्याचे काम करताना या विहिरीवर कॉक्रिट टाकल्यामुळे अर्धा भाग बंद झाला आहे. त्या भागावर परिसरातील व्यावसायिक कचरा टाकतात, तसेच त्या विहिरीच्या दुसऱ्या बाजूला हॉटेल व्यावसायिकांचे अनेक प्लास्टिकचे बॉक्स व कागदी कचरा साचलेला आहे. असे असतानाही त्या विहिरीचे पाणी व्यावसायिक वापरत आहेत. ही विहीर स्वच्छ करावी, अशी मागणी करण्यात येत आहे, सध्या पाऊस पडत असल्यामुळे तेथील कचऱ्यामध्ये पाणी साचून डेंगीचे डास तयार होऊ शकतात. भविष्यातील धोके लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे ग्रामस्थांचे मत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:23 PM 23/Jul/2024
What's Your Reaction?