रत्नागिरी : डोर्ले-हर्चे रस्त्यावरील खड्डे भरण्याची मागणी
पावस : रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले-हर्चे रस्त्यावरील खड्डे पडून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, त्याची त्वरित १५ दिवसांच्या आत सुधारणा न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी दिला आहे. याबाबत गेली कित्येक वर्षे रस्त्याची सुधारणा करण्याबाबत वेळोवेळी कळवूनसुद्धा अद्यापपर्यंत दखल घेतलेली नाही. प्रशासनाच्या बेलगाम कारभाराला जाग आणण्यासाठी आंदोलन उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:36 PM 26/Jul/2024
What's Your Reaction?