रत्नागिरी : पावसामुळे जिल्ह्यात दोन महिन्यांत ३६ कोटींची हानी

Aug 3, 2024 - 13:43
Aug 3, 2024 - 13:45
 0
रत्नागिरी : पावसामुळे जिल्ह्यात दोन महिन्यांत ३६ कोटींची हानी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात यंदाच्या पाऊस हंगामाच्या दोन महिन्यात पावसाने अडीच हजार मि. मी. ची सरासरी गाठली आहे. पावसाळी हंगमातील या दोन महत्वाच्या महिन्यातच पाऊस जोरदार पडतो. त्यानंतर पावसाचा जोर कमी होती. या दोन महिन्यांत पावसाने चारवेळा रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण केली. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदाचा पावसाची वाचटाल सध्या तरी समाधानकारक आहे. पावसाच्या या दोन महिन्यांत अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टमुळे जिल्ह्यात सुमारे ३६ कोटीची हानी केली आहे.

यंदा पाऊस वार्षिक सरासरीपेक्षा ६ ते १५ टक्के अतिरिक्त होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बिगर मोसमीची सुरुवात मे अखेरीस झाली. त्यानंतर मोसमी पाऊस नियोजित ७ जुलै रोजी सुरू झाला. मात्र, अन्य भागांत झालेल्या वादळाच्या प्रभावाने कोकणातील मोसमी वाऱ्याचा वेग आणि दिशा या दोन्हीत बदल होऊन पावसाचे वेळापत्रक नेहमीप्रमाणे निश्चित झाले. मात्र, १ जूनपासून पावसाने हलक्या स्वरूपात सुरुवात केली तर जून अखेरपर्यंत मासिक सरासरीही गाठली.

नियमित पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची बेगमी सुरू झाली. तसेच जुलैमध्येही सातत्य राखल्याने लावणीची कामेही वेळेवर झाली. ७७ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षाच्या तुलनेत १५ ते १८ टक्के पाऊस जादा झाला आहे. अजूनही पावसाचे दोन महिने शिल्लक आहेत. आतापर्यंत २३५५ मिलिमीटर एकूण पाऊस पडला असू, पावसाची सरासरी २६२३ मि. मी. झाली आहे. हाच जोर राहिला तर काही दिवसांतच जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीसाठी आवश्य असलेला हजार मि.मी. पाऊस पडणार आहे. मात्र, या वादळी पावसाने पहिल्या दोन महिन्यातच जिल्ह्यात तब्बल ३६ कोटी ६७ लाख ५७ हजार रुपयांचे नुकसान केले आहे.

या कालावधित जिल्ह्यातील प्रमुख नद्यांतील जलस्तर चारवेळा वाढून अनेकदा या भगात पूरस्थिती निर्माम केली. गेले दोन महिने सतत मुसळधार पडणाऱ्या पावसाने नद्यांलगत असलेल्या तालुक्यांमध्ये नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. जोडीला वाऱ्याचा मारा जोरदार असल्याने पडझड मोठ्या प्रमाणावर होत आहे. घरे, गोटे, दुकाने, शाळा, इमारती, साकव, पूल, सार्वजनिक विहिरी यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

जिल्ह्यातील प्रमुख नद्यांचे पात्र कधी इशारा पातळीवर तर कधी धोक्याच्या पातळीवर जात असल्याने तालुक्यांचेही जनजीवन विस्कळीत झाले. अनेक दुर्गम आणि पूरप्रवण भगातील आतापर्यंत अडीचशे कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे लागले. वादळी पावसामुळे जिल्ह्यात पडझडीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वादळी वाऱ्याच्या माऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे जिल्ह्यात अपरिमित हानी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या, बांधकाम विभागाचे रस्ते, संरक्षण भिंती, साकव, इमारती, पूल मोऱ्या यांना या पावसाचा फटका बसला आहे. महावितरणचे वीजखांब आणि ट्रान्सफॉर्मर; तसेच पाणीपुरवठा विभागाच्या पाइपलाईन आणि विहिरी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

काही भागात घरे, गोठे, दुकाने आणि या सर्व यंत्रणांचे मिळून १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीतच जिल्ह्यात तब्बल ३६ कोटी ६७ लाख ५७ हजार रुपयांचे नुकसान झाले. मुसळधार पावसाने प्रमुख नद्यांनी जलस्तर ओलांडल्याने आलेल्या पुराने नदीकिनारी भगात असलेल्या २१ गावातील १५९ शेतकऱ्यांची सुमारे १५ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. या कालावधीत पक्क्या घरासहित अनेक मालमत्तांचे अंशतः तर काही भागात पूर्णतः नुकसान झाले. यामध्ये २३८ अंशतः घरांचे ८ कोटी ७४ लाख ११ हजार ७६६ रुपयांचे नुकसान झाले तर पूर्णतः ३१७ घरांचे १६ कोटी ६१ लाख ४२ हजार ७९६ रुपयांचे नुकसान झाले. अंशतः आणि पूर्णतः गोठपांचे दोन कोटी दहा लाख ८ हजार ९४५ रुपयांचे नुकसान झाले. ९१ खासगी मालमत्तांचे पाचकोटी ३० लाख ४८ हजार ६००, सार्वजनिक मालमत्तांच दोन कोटी ४७ लाख २५ हजार ९५०, तर व्यापारी व्यस्थापनांचे तीन कोटी २० लाख ७५ हजार ५०५ रुपयांचे नुकसान झाले. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील १२ जनावरे दगावल्याने दोन लाख ५ हजारांची हानी झाली. रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या दणक्याने जिल्ह्यातील १८७ गावातील गावातील ३८८ महावितरण रोहित्रावरील वीजपुरवठा बाधित झाला. त्यामुळे कृषी ग्राहकांचा आणि ४६८० अकृषक वीज ग्राकांचा वीज पुरवठा प्रभावित झाला.

जिल्हा आपत्ती नियंत्रण विभागाची सतर्कता
अजूनही पावसाचे दोन महिने शिल्लक आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. आता पाऊस श्रावणात सरीवर राहणार असला, तरी काही भागांत जोरदार सक्रिय राहणार आहे. जिल्हा आपत्ती नियंत्रण विभाग या कालवधित २४ तास सतर्क राहणार आहे. जिल्हा आपत्ती विभागाने प्रामुख्याने नदीतील जलस्तरावर लक्षकेंद्रित केले असून, तेथील वाढलेल्या जलस्तरावर जिल्ह्यातील आपत्ती नियंत्रण यंत्रणा सतर्क केली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 03/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow