Bigg Boss Marathi :"तुम्हाला पुरस्कार देऊन त्यांना...;" वर्षा उसगावकरांना 'तुमची घाणेरडी ॲक्टिंग..' म्हणत जान्हवी संतापली

Aug 10, 2024 - 13:46
 0
Bigg Boss Marathi :"तुम्हाला पुरस्कार देऊन त्यांना...;" वर्षा उसगावकरांना 'तुमची घाणेरडी ॲक्टिंग..' म्हणत जान्हवी संतापली

बिग बॉस मराठीच्या नवीन सिझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिझनमध्ये प्रत्येक दिवशी काही ना काही वादविवाद होताना दिसत आहेत. बिग बॉस मराठीच्या नवीन सिझनमध्ये काल कल्ला टीव्हीमध्ये उर्वरित सदस्यांचे परफॉर्मन्स झाले.

परफॉर्मन्स झाल्यावर जान्हवी आणि वर्षाताईंमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यावेळी जान्हवीने वर्षाताईंचा अभिनय आणि त्यांना मिळालेले पुरस्कार यावर बोट ठेवलं. काय घडलं नेमकं बघा.

जान्हवी वर्षाताईंवर संतापली कारण...

झालं असं की, गार्डन एरियामध्ये जान्हवी, निक्की, वैभव हे सर्वजण बसले होते. तेव्हा जान्हवी आर्याला उद्देशून निर्लज्ज असं म्हणाली. तेव्हा वर्षा उसगावरकर दुसऱ्या ग्रुपसोबत बाजूला बसल्या होत्या. त्या "निर्लज्जम समर्पयामी" असं म्हणाल्या. हे ऐकताच जान्हवी वर्षाताईंवर बरसली. ती म्हणाली, "ताई मी तुमचा पहिल्या दिवसापासून रिस्पेक्ट करत आलीय. माझ्या नादी लागू नका. पोरं बसतात तिथे तुम्ही केस उडवत येता. तुमची घाणेरडी ॲक्टिंग मला नका दाखवू."

यावर वर्षा ताईही काही गप्प बसत नाहीत. जान्हवी बोलत असताना वर्षा उसगांवकर तिच्या प्रत्येक वाक्याला प्रतिउत्तर देताना दिसत आहेत. या भांडणादरम्यान वर्षा ताई म्हणतात, “मी इथे १०० दिवस टिकणार नंतर बाहेर जाणार, फालतू गोष्टींकडे मी दुर्लक्ष करते. काय तुझी ही गलिच्छ भाषा. याच ऍक्टिंगमुळे मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. तोही तीन वेळा”.

हे बोलल्यानंतर जान्हवी प्रतिउत्तर देत म्हणते, “तुम्हाला पुरस्कार देणाऱ्यांना आज पश्चाताप होत असेल की, आपण कोणाला पुरस्कार दिला म्हणून”. वाद टोकाला जाताना पाहून ‘बिग बॉस’च्या घराची कॅप्टन अंकिता भांडण शांत करण्याचा प्रयत्न करते. “तू त्यांच्या ऍक्टिंगला नको बोलू”, असंही वर्षा ताई यांचा आदर ठेवत अंकिता जान्हवीला म्हणते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:11 10-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow