राजापूर : समृद्ध कोकण संघटनेतर्फे 'स्वराज्यभूमी आंदोलन' छेडण्याचा इशारा

Aug 21, 2024 - 10:14
 0
राजापूर : समृद्ध कोकण संघटनेतर्फे 'स्वराज्यभूमी आंदोलन' छेडण्याचा इशारा

राजापूर : शासनाला सुमारे चाळीस टक्के महसूल दरवर्षी देणाऱ्या कोकणचा विकास वर्षानुवर्षे रखडलेलाच आहे. कोकणातील आंबा काजू बागायतदार, मच्छीमार यांचे प्रश्न वर्षानुवर्षे तसेच प्रलंबित आहेत.

आंबा-काजू बोर्डाची घोषणा झाली; मात्र त्याला निधी नाही. कोकण विकास प्राधिकरणाचा पत्ता नाही. कोकणच्या रखडलेल्या विकासाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समृद्ध कोकण संघटनेच्या माध्यमातून 'स्वराज्यभूमी आंदोलन' छेडण्यात येणार आहे, अशी माहिती स्वराज्यभूमीचे मुख्य समन्वयक संजय यादवराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. तालुक्यातील भू येथून या स्वराज्यभूमी आंदोलनाला गुरूवारी (ता. २२) सकाळी १० वा. सुरुवात होणार असून सलग तीन दिवस या ठिकाणी साखळी उपोषण होणार आहे. त्याची शासनाने दखल न घेतल्यास रविवारपासून (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येणार आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी, मच्छीमार, व्यावसायिक सहभागी होणार असल्याची माहिती यादवराव यांनी दिली. या पत्रकार परिषदेला यादवराव यांच्यासह समन्वयक संजय सरफरे, बाबा सरफरे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 21/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow