कोल्हापुरात जोरदार पाऊस; पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. सर्वच धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.
चार धरणक्षेत्रांत धुवाधार..
घटप्रभा, पाटगाव, कोदे, कासारी या चार धरणक्षेत्रांत धुवाधार पाऊस कोसळला आहे. सरासरी ११० मिली मीटरपेक्षा अधिक पाऊस येथे झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे.
पडझडीत ३.९० लाखांचे नुकसान
जिल्ह्यात २० खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये ३ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
ऑरेंज अलर्टचा इशारा
कोल्हापूरसह सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यासाठी आज, सोमवारी हवामान विभागाने ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. दिवसभरात जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 26-08-2024
What's Your Reaction?