Maharashtra Weather Forecast : कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकला.., महाराष्ट्रात मुसळधार कोसळणार? वाचा वेदर रिपोर्ट
मुंबई : पूर्व विदर्भात केंद्रीत झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता पश्चिमेकडे सरकले आहे. त्यामुळे पुढील चार-पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी राहणार आहे. मात्र, मुंबईसह उपनगरात बुधवारी पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
आयएमडीने (Maharashtra Weather Updates) जारी केलेल्या अंदाजानुसार, आज बुधवारी विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील. तसेच मुंबईसह, ठाणे, रायगड, पालघर तसेच कोकणातील बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. पुणे जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या चक्रीवादळाने बेफाम पाऊस (Rain in Maharashtra) झाला. त्यामुळे राज्यातील कोरडी धरणं जिवंत झाली असून विहीरी देखील काठोकाठ भरल्या आहेत. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे.
तर काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने जमिनी खरडून गेल्या असून पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा करीत आहेत. दरम्यान, आता पुढील 12 तासांत पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन दूर झालंय.
राज्यात आज कुठे कुठे कोसळणार पाऊस?
मुंबई, पुणे ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी, कोकणातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव तसेच परभणी जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 04-09-2024
What's Your Reaction?