राज्यातील काजू बी शासन अनुदान ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी : शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत सादर करण्याच्या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी या अनुदान योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य काजू मंडळ तथा कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ संजय कदम यांनी केले आहे. राज्यातील काजू उत्पादक शेतक-यांना काजू बी साठी शासनाकडुन वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन दिल्यास, काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यास मदत होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 06/Sep/2024
What's Your Reaction?