कोकण रेल्वेच्या तीन दिवस खेड-मुंबई विशेष गाड्या
रत्नागिरी : गणपती विसर्जनानंतर मोठ्या संख्येने मुंबईकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेत कोकण रेल्वेने खेडमधून आजपासून तीन दिवस सहा विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे.
या गाड्या पनवेलपर्यंत धावतील. १३ सप्टेंबरपासून सकाळी सहा आणि दुपारी सव्वातीन वाजता खेड स्थानकातून या अनारक्षित गाड्या रवाना होतील. या गाड्यांना वीस डबे असतील. या गाड्यांना खेड ते रोह्यार्यंत सर्व स्थानकाला थांबे असतील. पुढे या गाड्या पनवेलला थांबतील. दि. १५ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजता सुटणारी गाडी सीएसटीएमपर्यंत धावेल. या गाडीला पनवेल, दादर आणि ठाणे स्थानकातही थांबा असेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:47 13-09-2024
What's Your Reaction?