Ratnagiri : जिल्ह्यात रविवारपर्यंत विजांसह वादळी पावसाचा इशारा

May 30, 2024 - 10:03
May 30, 2024 - 10:05
 0
Ratnagiri : जिल्ह्यात रविवारपर्यंत विजांसह वादळी पावसाचा इशारा

रत्नागिरी : पश्चिमेकडील वारे, रेमलचा प्रभाव आणि अरबी सागरात मोसमी पाऊस दाखल होण्यास झालेल्या अनुकूलनेने कोकण किनारपट्टी भागात बुधवारी सकाळपासून मळभाचे ढग जमा झाले आहे. गेले दोन दिवस ही वातावरणीय स्थिती असून पूर्वमोसमी सरी बरसण्यासाठी अनुकूल ठरत आहेत. मंगळवारी कोकणातील काही भगात पूर्वमोसमीच्या सरी झाल्या. रत्नागिरी जिल्ह्यातही राजापूर, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात हलक्या पावसाची आगमन निर्गमन चालूच होते.

गेल्या आठवड्यातील उकाड्यात काही प्रमाणात खंड पडला. बुधवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात मळभी वातावरणात ३० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दुपारपर्यंत मात्र तापामानात वाढ होऊन पुन्हा तीव्र उकाडा जाणवू लागला. मात्र, पुन्हा मळभाने तापमानात उतार झाला. दिवसभर तापमानाचा चढउतार मळभाच्या ढगाने सुरूच ठेवला होता. मंगळवारी रात्री किमान तापमानातही उतार झाला होता. त्यामुळे उकाडा कमी जाणव होता. बंगालच्या उपसागारत निर्माण झालेले रेमल चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर त्याचा जोर कमी झाला आहे तर अरबी सागरात मोसमी पाऊस सक्रीय होण्याच्या हाचलचालींनी बळ आले आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारपासूनपासून रविवारपर्यंतपर्यंत विजांसह वादळ पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:04 30-05-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow