कृषी पुरस्कारासाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत

Jul 17, 2024 - 17:28
 0
कृषी पुरस्कारासाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत

रत्नागिरी : उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्याला किंवा संस्थेला कृषी विभागातर्फे दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

प्रत्येक पुरस्काराचे स्वरुप, निकष वेगवेगळे आहेत. शासनातर्फे शासकीय सन्मानात शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. दरवर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पुरस्कारासाठी निवड केली जाते. या शेतकऱ्यांकडून अन्य शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशाने हे पुरस्कार देण्यात येतात. इच्छुक शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी कृषी विभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे यांनी केले आहे.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:54 17-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow