Bigg Boss Marathi Season 5 : निक्कीने काढली वर्षा उसगांवकरांची अक्कल..
बिग बॉसच्या नव्या सिझनमध्ये(Bigg Boss Marathi Season 5) पहिल्याच दिवशी वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) आणि निक्की तांबोळीमध्ये (Nikki Tamboli) वाद झाल्याचं पाहायला मिळालं.
बिग बॉस घरातल्या सदस्यांना सांगतात की, बेडचा वापर करण्याची आता परवानी नाही. म्हणून आता घरातल्या सगळ्या सदस्यांना जमिनीवर त्यावर निक्की वर्षा उसगांवकर यांच्यावर भडकते. त्याचप्रमाणे त्या देखील तिच्यावर चांगल्याच वैतागतात. त्यामुळे आता वर्षा उसगांवकर यांच्या कोणत्या चुकीमुळे घरातल्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
नेमकं काय घडलं?
बिग बॉस जेव्हा सांगतात की, आता बेडचा वापर करायला परवानगी नाही. तेव्हा वर्षा उसगांवकर या बिग बॉसला म्हणतात की, चुकून झालं. त्यावर निक्की भडकते आणि ती म्हणते आता आम्हाला भोगावं लागतंय ना. तुमच्यामुळे आम्हाला जमीनीवर झोपावं लागतंय. त्यावर वर्षा उसगांवकर तिला म्हणतात की, माझ्या एकटीमुळे झोपावं नाही लागत आहे. जेव्हा तुम्ही झोपला होता, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? निक्कीला वर्षा उसगांवकर म्हणतात की, ओरडू नकोस, त्यावर निक्कीही म्हणते की, तुम्ही शांत बसा.
बिग बॉसच्या घरात खाण्यासाठी आणि पिण्यासाठी संघर्ष
बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी घरातलं पाणी गेलं. त्यानंतर लॅविश ब्रेकफास्ट आयोजित करुनही स्पर्धकांना त्याचा आस्वाद घेता नाही आला. त्यासाठी घरातल्या स्पर्धकांना ज्यांच्याकडे निर्णयक्षमता नाही, अशा तीन स्पर्धकांना नॉमिनेट करण्यास सांगितलं. तेव्हा घरातल्यांनी सूरज चव्हाण, इरीना आणि धनंजयला नॉमिनेट केलं. आता हे तिघं मिळून घरातल्यांसाठी काही वस्तू आणतात. त्यावरुन घरात काय राडा होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:23 30-07-2024
What's Your Reaction?