लांजा : व्हेळ, शिरवलीत गव्यांकडून नुकसान

Jul 31, 2024 - 13:33
 0
लांजा : व्हेळ, शिरवलीत गव्यांकडून नुकसान

लांजा : लांजा तालुक्यातील शिरवली, व्हेळ या गावांत गवामुक्त संचारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेली दोन वर्षे या भागात गव्यांचा संचार सुरू आहे. भातशेतीतून गव्यांची भ्रमंती सुरू असल्याने नुकसान होत आहे. गतवर्षी शिरवली गावात काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. विलवडे ते शिरवली या रस्त्यावरून गवा फिरत असल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी, शेतकरी जीव मुठीत घेऊन जात आहेत. 

सध्या शेतीचा हंगाम सुरू झाल्यानंतर आंबाघाटातून गवे पूर्व भागात खाली येतात. गतवर्षी वनविभागाला या संदर्भात खबर देण्यात आली होती. नुकसानीचे पंचनामे झाले; परंतु संबंधित शेतकऱ्याला अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. या गावचे सामाजिक कार्यकर्ते दीपक मोडक यांनी गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:07 PM 31/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow