100 व्या नाट्यसंमेलनाची सांगता पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत?, रत्नागिरीत रंगणार रंगारंग सोहळा
सांगली : शंभराव्या नाट्य संमेलनाची सांगता रत्नागिरी येथे होत आहे. सांगतेचा रंगारंग सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पंतप्रधानांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला आहे.
कोल्हापूर, इस्लामपूर, नागपूर, नगरमध्येही कार्यक्रम
शंभरावे नाट्यसंमेलन राज्यभर घेण्याच्या परिषदेच्या नियोजनानुसार कोल्हापूर, इस्लामपूर, नागपूर, अहमदनगर येथेही कार्यक्रम होणार आहेत. नागपूर व नगरला विभागीय संमेलने होतील, तर कोल्हापूर, इस्लामपूरला एक-दोन दिवसांचे कार्यक्रम होतील. आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड येथेही कार्यक्रम झाले आहेत. मुंबईतही एक-दोन दिवसांचे कार्यक्रम घेण्याचे नियोजन आहे.
रत्नागिरीतील सांगता सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोकणातील स्थानिक कलाकारांच्या सहभागाने आठ दिवसांचा हा सांगता सोहळा रंगेल. शंभरावे संमेलन वर्षभर सुरू असून यामध्ये दिवाळी, गणेशोत्सव आणि महाविद्यालयांच्या परीक्षा असा खंड येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरातील विभागीय संमेलन रद्द केले तरी चालेल, असाही प्रस्ताव परिषदेला दिला आहे. यापूर्वी ९९वे संमेलन नागपूरला झालेच आहे. -मुकुंद पटवर्धन, कार्यकारिणी सदस्य, नाट्य परिषद
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:56 06-08-2024
What's Your Reaction?