चिपळूण : वाशिष्टीला नारळ अर्पण करत गोवळकोटवासीयांनी जपली शेकडो वर्षांची परंपरा
चिपळूण : चिपळूण शहराजवळील गोवळकोट येथे नारळी पौर्णिमेनिमित्त भोईवाडी आणि गोवळकोट येथील ग्रामस्थांनी खाडीमध्ये नारळ अर्पण करत देवाला साकडे घातले. खाडीच्या ठिकाणी येऊन नारळाची विधिवत पूजा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा ते जपत आले आहेत.
चिपळूण शहराजवळील गोवळकोटमध्ये नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. येथील भोई समाजाचे बांधव नारळी पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करतात. गोवळकोटची खाडी आणि भोई समाजाचे नाते अतूट आहे. खाडीमध्ये मिळालेल्या माशांची विक्री करून ते उदरनिर्वाह करत होते. अनेकांनी मासेमारीचा व्यवसाय सोडला असला तरीही परंपरा सोडलेली नाही. नारळी पौर्णिमा सणादिवशी कोळीबांधवांचा आनंद ओसंडून वाहत असतो. खरेदी केलेले भरजरी कपडे घालून किंवा पारंपरिक कोळी समाजाचा पोशाख घालून भोई बांधव-भगिनी सायंकाळी खाडीकिनारी आले. गोवळकोट धक्क्यावर नारळी पौर्णिमेनिमित्त वाशिष्टीत नारळ अर्पण करण्यात आला. या वेळी गोवळकोटमधील सर्व वाड्यांमधून ग्रामस्थ हरिभजनाचा जप करत गोवळकोट धक्क्यापर्यंत एकत्र आले. भोईवाडी आणि गोवळकोट गावातून येणाऱ्या दिंड्या गोवळकोट धक्क्यावर एकत्र झाल्या आणि सामूहिक पद्धतीने नारळ अर्पण करण्यात आले. नारळ अर्पण केल्यानंतर देवाला साकडे घालण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 20/Aug/2024
What's Your Reaction?