आरोग्य सुविधा घरोघरी पोहोचाव्यात : पालकमंत्री उदय सामंत

Sep 10, 2024 - 10:03
Sep 10, 2024 - 10:41
 0
आरोग्य सुविधा घरोघरी पोहोचाव्यात : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : आरोग्य वर्धिनी उपकेंद्राच्या माध्यमातून नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल, आरोग्याच्या सुविधा घरोघरी पोहोचल्या पाहिजेत, अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.

शहरानजिकच्या मिरजोळे पडवेवाडी (कुवारबाव) येथे आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्व आठल्ये, सरपंच रत्नदीप पाटील, माजी सरंपच राजेश तोडणकर, माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच मिरजोळे, कुवारबाव् येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र उदय सामंत म्हणाले की, १५ व्या वित्त् आयोगामधून ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये चांगली आरोग्य सुविधा  मिळावी, हे शासनाचे धोरण आहे. ८ दिवसांपूर्वी अशा प्रकारच्या एक दवाखान्याचे मिरकरवाडा येथे उद्घाटन झाले. आरोग्याची सुविधा  घरापर्यंत पोहोचली पाहिजे, सुविधा  पोहचत असताना कोणत्याही  व्यक्तीला त्रास होऊ नये, ही सरकारची  भूमिका आहे. या आरोग्य वर्धिर्न उपकेंद्राच्या माध्यमातून नागरिकांन चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी  यावेळी व्यक्त केला.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 9/10/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow