गडगडी धरण समितीचा जलआक्रोश मोर्चा स्थगित

Jul 1, 2024 - 17:12
 0
गडगडी धरण समितीचा जलआक्रोश मोर्चा स्थगित

साखरपा : गडगडी धरण कृती समितीतर्फे आयोजित केलेला जलआक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. शासनाकडून मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे समितीने हा निर्णय घेतला आहे. 

गडगडी धरणाचा पाणी प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबितच आहे. धरणातून दोन कालवे काढण्यात आले असले, तरी पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे. धरण असूनही गावात भीषण पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे कृती समितीतर्फे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी २ जुलैला देवरुख येथे जलआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. पण, शासनस्तरावर या विषयाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. खासदार नारायण राणे यांनी शिफारसपत्र जलसंपदा विभागाकडे दिले आहे. शासनाकडून सुधारित स्ट्रक्चरल डिझाईन लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी आमदार शेखर निकमही प्रयत्नशील असून ते पाठपुरावा करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:40 01-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow