रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६ हजार ९०९ बागायतदार विमा परताव्याच्या प्रतीक्षेत...

Aug 13, 2024 - 14:12
 0
रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६ हजार ९०९ बागायतदार विमा परताव्याच्या प्रतीक्षेत...

रत्नागिरी : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा कालावधी संपून दोन महिने लोटले तरीही विमा कंपन्यांनी परतावा जाहीर केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३६ हजार ९०९ बागायतदारांना परताव्याची प्रतीक्षा आहे.

विमा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून ४५ दिवसात बागायतदारांना विमा परतावा रक्कम प्राप्त होणे आवश्यक आहे; मात्र, अद्याप विमा कंपन्यांकडून परतावाच जाहीर केला नसल्याची बाब पुढे आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपिक विमा योजना केंद्र शासनाने जाहीर केली आहे. जिल्ह्यातील आंबा, काजूपिकाचा समावेश फळपीक विमा योजनेंतर्गत करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात सहभागी शेतकऱ्याची संख्या वाढत आहे. जिल्ह्याचील ३० हजार ६८ आंबा बागायतदार तर ६ हजार ८४१ काजू बागायतदार विमा योजनेत सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांनी एकूण २० हजार ७८६.१६ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. २७ कोटी ३९ लाख ९ हजार १५ एकूण प्रस्तावित विमा रक्कम आहे.

राज्य शासन हप्त्याची रक्कम ५३ लाख ३४ हजार ४६ तर केंद्र शासन हप्त्याची रक्कम ३१ लाख ३५ हजार ६४, शेतकरी हप्त्याची रक्कम २४ लाख ११ हजार ५० मिळून एकूण १० कोटी ८८ लाख १ हजार ६१ रुपये विम्मा ह्प्ता जिल्ह्यात एकूण १ हजार ५५१ गावे व ८४५ ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यात ८२ महसूल मंडळे असून महसूल मंडळांतर्गत पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आली आहेत. ही यंत्रे डोंगरखोऱ्यातील, वाडीवस्तीलगतचे तापमान नोंदविण्यात दुर्बल ठरत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या तीन वर्षांपासून शासनाचे ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित तापमानमापक यंत्र बसविण्याचे घोंगडे अद्याप भिजत आहे. दरम्यान, विमा हप्त्यापोटी राज्य शासन ५३ लाख ३४ हजार ४६ रुपये भरते तर केंद्र शासन ३९ लाख ३५ हजार ६४ रुपये, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हप्त्यापोटी २४ लाख ११ हजार ५० रुपये भरले आहेत. एकूण विमा हप्ता १० कोटी ८८ लाखा इतका आहे.

दरवर्षी हवामानातील बदलाचा परिणाम पिकाच्या उत्पादकतेवर होतो. बागायतदार मोठ्या संख्येने विमा योजनेत सहभागी होतात; मात्र, महसूल मंडळातील ट्रिगर अॅक्टिव्हेट होत नसल्याने प्रत्यक्ष नुकसान ग्राह्य धरले जात नाही. त्यामुळे अपेक्षित परतावा मिळत नाही. - राजन कदम, बागायतदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 13/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow