मंडणगड : महामार्गावरील तुळशी घाटात रस्त्याची दुरवस्था; वाहतूक बंद पडण्याचा धोका

Jun 17, 2024 - 09:48
 0
मंडणगड : महामार्गावरील तुळशी घाटात रस्त्याची  दुरवस्था; वाहतूक बंद पडण्याचा धोका

मंडणगड :  तुळशी घाटातील पालवणी येथील पोलिस चेक पोस्ट ते तुळशी या ५ किलोमीटर अंतरात पावसाला सुरुवात झाल्यावर एकदोन नव्हे तर १७ ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे रस्त्याचे काम होऊनही हा रास्ता वाहतुकीस योग्य राहिलेला नाही, पावसाच्या सुरुवातीलाच ही स्थिती लक्षात घेता मुसळधार पावसात, तर या मार्गावर दरडी कोसळून वाहतूक बंद पडण्याचा धोका कायम आहे.

यंदाच्या बांधकाम हंगामाच्या सुरुवातीस मंडणगड ते पाले या दोन गावाच्या हद्दीतील अंतरात कॉक्रिटीकरणाच्या कामास सुरुवात झाली. यासाठी जुना रस्ता पूर्णपणे खोदून टाकण्यात आला. या शिवाय रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तुळसी घाटाकडील डोंगराच्या बाजूने अनेक ठिकाणी खोदकाम करून वळणे रुंद करण्यात आली. याचबरोबर दरडीकडील भागातही खोदकाम झाले असली तर संरक्षण भिंतीचे काम अजून पूर्णत्वास गेलेले नाही, यासाठी डोंगराकडील खोदकाम केल्यावर भविष्यात येथे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून दरड कोसळली तर काय करणार, याकडे लक्ष देण्यात आलेले नाही, त्यामुळे पावसाला सुरुवात होतानाच डोंगराकडील बाजूने सतरा ठिकाणी दरड कोसळून मोठे दगड धोंडे रस्त्यावर आले. दरड कोसळणाऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज पुढे आली आहे. या पूर्वी तुळशी घाटात दरड कोसळणणाची घटना दोन तीन दिवस सातत्याने पाऊस पडल्यावर घडत असत व मान्सूनचे पूर्ण हंगाम एक व दोन प्रकार घडत असत. डोंगराकडील व दरडीकडील अशा दोन्ही बाजूने आवश्यक असलेल्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपायांकडे प्राधिकरण व ठेकेदाराने यंदा दुर्लक्ष केल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे. त्यातही रस्त्याची किमान एक बाजू पावसापूर्वी वाहतुकीस योग्य करुन देण्याचे संबंधितांचे आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी वषणांची तरतूद करण्यात आली आहे.

या महामार्गावर माती व सिखलातून लहान चाकी वाहनांना कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत, मोठ्या पावसास अद्याप सुरुवात झालेली नाही. असे असताना सलामीला सतरा ठिकाणी दरड कोसळल्या असतील तर धुवाधार पावसात रस्ता दरडी कोसळून वाहतुकीस बंद होण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

मंडणगड तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाने कोसळणाऱ्या दरडीचे प्रमाण लक्षात घेऊन पावसाची दिवसात या मार्गावर दरडी साफ करण्यासाठी २४ तास जेसीबी व मलबा व्यहून नेण्यासाठी ट्रॅक्टर तैनात ठेवण्याची मागणी तालुकावासीयांमधून केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 17/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow