मुद्रांक शुल्क अभय योजनेत सवलत

Jun 29, 2024 - 16:03
 0
मुद्रांक शुल्क अभय योजनेत सवलत

रत्नागिरी : मुद्रांक व शुल्क विभागाने काही कारणास्तव बांधकामावरील चुकीचे मुद्रांक भरलेल्या अथवा कमी मुद्रांक भरणाऱ्यांना अभय योजना लागू केली आहे. त्या अभय योजनेंतर्गत दंड रकमेवरही सवलत देण्यात आली आहे. 

या योजनेचा तिसरा टप्पा ३० जून २०२४ पर्यंत वाढविण्यात आला असून, यात १ रुपयापासून १ लाखापर्यंतच्या मुद्रांक शुल्कावर ८० टक्के, तर त्यावरील रकमेवर ७० टक्के सवलत देण्यात येणार आहे. शासनाने मुद्रांक शुल्क अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेत १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत दाखल केलेले किंवा न केलेल्या दस्तावरील मुद्रांक शुल्क आणि त्यावरील दंडात सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार १ फेब्रुवारी २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत अर्ज करणाऱ्यांना १ ते १ लाख रुपयांपर्यंत असलेल्या रकमेसाठी मुद्रांक शुल्कात तसेच दंडाच्या रकमेतही ८० टक्के सवलत दिली जाणार असून २० टक्के मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:01 29-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow