आपल्या आईच्या नावाने प्रत्येकानं एक झाड लावावं, 'मन की बात'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन

Jul 1, 2024 - 11:34
 0
आपल्या आईच्या नावाने प्रत्येकानं एक झाड लावावं, 'मन की बात'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन

नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील नवीन एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी प्रथमच रविवारी मन की बातमधून (Man ki Baat) देशवासियांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. पर्यावरण आणि वृक्षारोपणाच्या संदर्भानं देखील पंतप्रधानांनी माहिती दिली. आई आणि मुलांचं नातं हे जगातील सर्वात मौल्यावान नाते आहे. आपण आपल्या आईसाठी काही देऊ शकत नाही. पण आपण आपल्या आईच्या नावाने एक झाड लावावे असं आवाहन पंतप्राधन नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून केलं.

30 जूनचा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आपले आदिवासी बांधव हा दिवस 'हुल दिवस' म्हणून साजरा करतात. हा दिवस परकीय राज्यकर्त्यांच्या अत्याचारांना कडाडून विरोध करणाऱ्या शूर सिद्धो-कान्हूंच्या अद्भूत धैर्याशी संबंधित असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. शूर सिद्धो-कान्हू यांनी हजारो संथाली कॉम्रेड्सना एकत्र करुन इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. 1855 मध्ये हे घडले होते. म्हणजे 1857 मध्ये भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या दोन वर्षे आधी. तेव्हा झारखंडच्या संथाल परगणा येथील आपल्या आदिवासी बांधवांनी परकीय राज्यकर्त्यांविरुद्ध शस्त्रे उचलली होती असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

2024 ची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात रेडिओ कार्यक्रमात देशवासियांना संबोधित करताना लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. आज मी देशवासियांचे आभार मानतो की त्यांनी आपल्या संविधानावर आणि देशातील लोकशाही प्रणालींवर आपला अतूट विश्वास व्यक्त केला आहे. 2024 ची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. एवढी मोठी निवडणूक जगातील कोणत्याही देशात झालेली नाही. या निवडणुकीत देशातील 65 कोटी लोकांनी मतदान केले आहे. यासाठी मी निवडणूक आयोगाचे आणि मतदान प्रक्रियेशी संबंधित सर्वांचे अभिनंदन करतो असंृेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी तब्बल चार महिन्यांनंतर पहिल्यांदाच मन की बातमधून साधला संवाद

लोकसभा निवडणुकींच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला नव्हता. पंतप्रधान मोदींनी तब्बल चार महिन्यांनंतर पहिल्यांदाच मन की बात रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेशी संवाद साधत असतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 01-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow