'अलमट्टीचा पाणीसाठा कमी करा; अन्यथा सांगली, कोल्हापूरला पुराचा धोका'
सांगली : कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि कृष्णा नदीवरील हिप्परगी बंधाऱ्यामध्ये नियमबाह्य पाणीसाठा केला आहे. या पाणीसाठ्यामुळेसांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होणार आहे.
जनहित याचिका दाखल करणार
सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासन, येथील जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना आम्ही कायदेशीर नोटीस दिली आहे. दि. २६ जुलैपर्यंत वाट पाहून आम्ही त्यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहोत, असा इशारा सर्जेराव पाटील यांनी दिला आहे.
पावसाची सहा नक्षत्रे शिल्लक, तोपर्यंत धरण भरले
पावसाळ्यातील नऊ नक्षत्रे ही पावसाची म्हणून ओळखली जातात. पहिली तीन नक्षत्रेही अजून संपलेली नाहीत. याचा अर्थ पावसाळा सुरू होऊन अजून जेमतेम दोन महिनेसुद्धा झालेले नाहीत. जोरदार पावसाची सहा नक्षत्रे अजून शिल्लक आहेत. तरीही कर्नाटक सरकार व तेथील जलसंपदा विभाग घाई करून धरणात पाणीसाठा वाढवत असून, त्यांची ही कृती अत्यंत धोकादायक आहे, असा आरोपही सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:23 18-07-2024
What's Your Reaction?