रत्नागिरीत आज पाणीपुरवठा बंद
![रत्नागिरीत आज पाणीपुरवठा बंद](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202407/image_870x_66823330d3bab.jpg)
रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून रत्नागिरीत जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणीटंचाई दूर झाली आहे. नगर परिषदेकडूनही पाणीपुरवठा नियमित सुरू झाला असून, सोमवारी (दि. १ जुलै) देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन नगर परिषदेने केले आहे.
पाणी टंचाईमुळे मे महिन्यात एक दिवसआड पाणीपुरवठा शहरात करण्यात येत होता. मात्र, जून महिन्यामध्ये जोरदार पडलेल्या पावसामुळे शीळ धरण भरून वाहू लागले आहे. मोठा पाऊस पडत असल्याने काही प्रमाणात नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रारीही होत आहेत. त्यामुळे शीळ जॅकवेल आणि साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी सोमवार १ जुलै रोजी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. त्यामुळे सोमवारी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 01-07-2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)