Ratnagiri : जिल्ह्यातील बोगस बियाणे, खताची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागातर्फे भरारी पथकं

Jun 8, 2024 - 15:28
Jun 8, 2024 - 15:52
 0
Ratnagiri : जिल्ह्यातील बोगस बियाणे, खताची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागातर्फे भरारी पथकं

रत्नागिरी :  खरीप हंगामात जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांनी बोगस बियाणे, खताची विक्री केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. बियाणे, खताची बोगस विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करत परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागातर्फे एका भरती पथकाची स्थापना आली आहे. प्रत्येक केंद्रावर 'वॉच' राहणार आहे.

खरीप हंगाम तोडावर आला आहे. या काळात बोगस खते, बियाणे विक्री करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यांनी परवानाधारक दुकानातूनच कृमी निविष्ठांची खरेदी करानी व पक्की पावती प्याली, बोगस बियाणे, खाते असल्यास शेतकऱ्यांनी कवळच्या कृषी कार्यालयात तक्रार करावी, असे अवाहन जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाला सुरुवात झाल्याने खरीप क्षेत्रात प्राथमिक टप्प्यातील कामे सुरू झाली आहे. खरिपासाठी जमिनीची नांगरणी, भाताच्या रोपवाटिका तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पेरणीची प्राथमिक तयारी करण्याच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. आता फक्त पावसाची प्रतीक्षा असून, शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून आहेत.

खरीप हंगामाच्या प्राथमिक टप्प्यात शेतकरी खताची जुळवाजुळव करू लागला आहे. नियमित पाऊस येण्याआधी खताची सुरक्षितरित्या साठवणूक करण्यात येत आहे. यासाठी खत विक्री केंद्रावर मागणी नोंदविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने खबरदारी घेतली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:54 PM 08/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow