रत्नागिरी : बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, गृहपयोगी वस्तू विनामूल्य

Jul 27, 2024 - 17:20
 0
रत्नागिरी : बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, गृहपयोगी वस्तू विनामूल्य

रत्नागिरी : बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, अत्यावश्यक संच व गृहोपयोगी वस्तूसंच विनामूल्य आहेत. कामगारांनी कोणत्याही व्यक्ती, एजंट किंवा संघटना यांच्याशी कोणताही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्तांनी केले आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जिल्ह्यातील नोंदित जीवित (सक्रिय) बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, अत्यावश्यक संच व गृहोपयोगी वस्तूसंच (भांडी) वाटप करण्यात येते. संचाचे वाटप करण्यासाठी माफतलाल इंडस्ट्रीज लि. या कंपनीची शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली असून संचाचे वाटप करताना संच विनामूल्य आहेत, याची नोंद घ्यावी. काही कामगार एजंट किंवा संघटना यांच्याशी आर्थिक व्यवहार करताना दिसून येत आहेत. कामगारांनी कोणत्याही व्यक्ती, एजंट किंवा संघटना यांच्याशी कोणताही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये. अशा आर्थिक व्यवहारातून फसवणूक झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही. अशा फसवणुकीबाबत तक्रार आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करून तक्रार दाखल करण्यात यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:41 27-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow