29 ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा, 4-5 जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच : मनोज जरांगे

Jul 20, 2024 - 11:44
 0
29 ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा, 4-5 जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच : मनोज जरांगे

मुंबई : 29 ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा असं म्हणत मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी चार-पाच जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समीकरण जुळले नाही तर पाडापाडी करावी लागेल असं म्हटलंय.

मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये पाचव्यांदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. 29 ऑगस्टला बैठक घेऊन 288 आमदार पाडायचे की ठेवायचे याबाबत ठरवू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. यावेळी आपल्याला राज्यात मतदारसंघनिहाय तयारी करायची असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्याला समीकरण जुळवावे लागणार

एका जातीवर कोणीच निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला समीकरण जुळवावं लागणार आहे असं मनोज जरांगे म्हणालेत. समीकरण जुळले नाही तर आपल्याला उमेदवार उभे करून जमणार नाही. जो म्हणेल ओबीसीमधून तुमची मागणी पूर्ण करू त्याला निवडून आणायचं. मग पाडापाडी करावी लागेल असं म्हणत 29 ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय.

चार ते पाच जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच

राज्यात असा एकही मतदार संघ नाही ज्यात 50 हजार मराठा नाहीत. एका जातीवर कोणीच निवडून येऊ शकत नाही. चार-पाच जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच असा आश्वासन त्यांनी मराठा समाजाला देत आज पासून इच्छुकांनी यायला हरकत नाही असं मनोज जरांगे म्हणाले.

उमेदवार पसंत नसला तरी त्याला मतदान करायचं

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला मतदारसंघनिहाय तयारी करायची आहे. यासाठी सर्व डेटा तयार करण्यासाठी सर्वांनी 14 ते 20 ऑगस्टमध्ये इच्छुक उमेदवारांनी यावं असा आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज तरंगे यांनी सर्व जाती धर्मातील इच्छुक उमेदवारांनी तसेच छोटे-मोठे पक्ष आजी-माजी सर्वांनी यावे. गावागावातून माहिती घ्या, उमेदवार पसंत नसला तरी त्याला मतदान करायचं असे म्हणत राज्यातील आंदोलनाच्या वर्षपूर्ती रोजी म्हणजेच 29 ऑगस्टला बैठक घेऊन 288 आमदार पाडायचे की ठेवायचे याबाबत ठरवू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय.

मराठ्यांना धोका दिल्याने पुन्हा एकदा उपोषणाची वेळ

पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने मराठ्यांना धोका दिल्याने पुन्हा एकदा उपोषणाची वेळ आली आहे. समाजासाठी मी आमरण उपोषण करत आहे. समाजाचे फक्त मी एवढंच ऐकत नाही. समाज मला आमरण उपोषण करू नका, असे म्हणत होता. सगेसोयरेची अंमलबजावणी करा, गुन्हे मागे घ्या, तीनही गॅझेट लागू करा. आरक्षण द्यायचे असेल तर बहाण्याची सरकारला गरज नाही. मराठा समाजाच्या मुलांना नोकरभरती, ऍडमिशनमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. Ews सुरू ठेवावे. Ecbc आणि कुणबी हे तीनही प्रमाणपत्र सुरू ठेवावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 20-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow