रत्नागिरी : जयस्तंभ येथील सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम सुरू

Jun 8, 2024 - 10:11
 0
रत्नागिरी : जयस्तंभ येथील सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम सुरू

रत्नागिरी : शहराच्या जयस्तंभ येथील सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सकाळपासून दुपारपर्यंत जेलनाका आणि मारुती मंदिर येथील सिग्नल बंद ठेवण्यात आले होते. 

रत्नागिरी शहरामध्ये मोठ्या बाजारपेठेसह बहुसंख्य प्रशासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. एक मुख्य रस्ता असून इतर अंतर्गत रस्ते या मुख्य रस्त्याला मिळतात. त्यामुळे वाहतुकीत बेशिस्तपणा निर्माण होत होता. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी शहरातील बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण येण्यासाठी सिग्नल यंत्रणा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न केले. पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा करून ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. यातून जेलनाका आणि मारूती मंदिर येथील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली. जयस्तंभ येथील नवीन सिग्नल यंत्रणा आली असून ती बसवण्याचे काम सुरू झाले आहे. लवकरच जयस्तंभ येथीलही सिग्नल सुरू होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 08-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow